*****************************************************************************************************
“ये उपरवाला भी अजीब है ना चचाजान?”
समोर बसलेल्या सत्तरीच्या घरातल्या, किमान अर्धाफुट दाढी असलेल्या, सुरकुत्यांनी व्यापलेल्या त्या कनवाळु चेहर्याकडे बघत त्यानेच दिलेल्या गमछाने केस पुसत मी विचारले. तसा तो गोड म्हातारा मिस्कील हसला..
क्युं बेटेजान, डर गये?
नही चचाजान, मै क्यु डरुंगा, मै तो यहा आपके सामने, आपकी इनायतसें, हिफाजतसे हूं! लेकिन एक नजर बाहर डालके देखीये….! हर तरफ आतंक मचा रख्खा है बारीशने! पता नही आज कितनी मांओने अपने बच्चे खोये होगे, कितने बच्चे अपनी मां की इंतजार करकरके थक गये होंगे! पता नही कितनी सुहागनोनें अपना सुहाग खोया होगा आज!
क्या सचमें भगवान है?
माझे डोळे नकळत भरून आले होते. तसे चाचाजी उठले, माझ्या डोक्यावरून हळुवारपणे हात फिरवला आणि उठून खिडकीजवळ गेले. खिडकीतून बाहेर बघत मला जवळ बोलावले.
“वो देखो बेटा… ऐसा नजारा देखा है कभी?”
मी बाहेर नजर टाकली. जिकडे बघावे तिकडे पाणीच पाणी झालेले. कुठेही कोरडेपणाचा लवलेशही नाही. मला न राहवून केविन कोस्टनरच्या वॉटरवर्ल्डची आठवण झाली. प्रलयच तर होता तो. मानवाच्या निष्काळजीपणामुळे, हलगर्जीपणामुळे संतापलेल्या निसर्गाने एकदाची आपल्या उद्रेकाला मो़कळी वाट करून दिली होती. सगळीकडे हल्लकल्लोळ माजलेला. जिथे पाहाल तिथे प्रचंड घाबरलेले, घराच्या काळजीने भर पावसात सुकलेले निष्प्राण चेहरे.
“और क्या देखना बाकी है चचाजान, कुछ देर पहले मै भी उनमेंसे एक था! आपने अगर हम लोगोंको घर के अंदर ना लिया होता तो अब भी मै वही अपनी मौत सें दो हात कर रहा होता….!”
माझी नजर खोलीकडे वळली. त्या १० बाय १२ च्या खोलीत जवळ जवळ १३-१४ माणसे दाटीवाटीनं उभी होती. पावसाचा सडाका वाढल्यावर चाचाने मोठ्या मनाने दार उघडून आत घेतलेल्या लोकापैकी होते ते. त्यातच चाचाच्या घरातले सात सदस्यही होते. मी ही जणु त्यांच्यापैकीच एक झालो होतो एका क्षणात. २-३ तासांपूर्वी मरोळच्या एका क्लायंटच्या ऑफीसात बसून त्याच्याशी ऑर्डर निगोशियेट करत होतो. शेवटी फायनल करुनच उठलो. त्या आनंदातच बाहेर आलो तेव्हा पावसाला बर्यापैकी सुरूवात झाली होती. म्हणून थोडा वेळ तिथेच थांबलो. पण पाऊस काही थांबायचे नाव घेइना, म्हणून तसाच धडपडत बाहेर पडलो. पण रोडवर सगळी वाहने अडकून पडलेली. पाणी गुड्घ्याच्या वर लागायला लागले होते. पाऊस प्रचंड कोसळत होता. तसाच चालत, धडपडत साकीनाक्याकडे निघालो.
“अरे भाई, आगे जाने से कोइ फायदा नही है! सफेद पुलके एरियामे सब चोकप हो गया है! पानी कमरतक पहुंच रहा है! कोइ बस नही जायेगी! ”
साकीनाक्याकडून आपली बाईक ढकलत निघालेल्या एका तरुण मुलाने सांगितले तसे काळजात धस्स झाले. पहिला विचार आला तो घरी काय झाले असेल? आण्णा आले असतील का? विनू कामावरून परत आला असेल का? सायली प्रचंड घाबरली असेल. लग्नाला अवघे सहाच महीने झाले होते आमच्या…….!
सुदैवाने घर तिसर्या मजल्यावर असल्याने घरात पाणी शिरण्याची भीती नव्हती. पण मुळात आता आपण घरापर्यंत पोहोचु की नाही याचीच शाश्वती नव्हती. सगळीकडे लोकांचा आरडा-ओरडा ऐकु येत होता. पाण्याचा स्तर वाढतच चाललेला. तेव्हा जवळ मोबाईलही नव्हते. घरी फोन करावा म्हणलं तर फोन लाईन्स अस्ताव्यस्त झालेल्या. निसर्गाचा एवढा प्रचंड उद्रेक कधीही अनुभवला नव्हता. तरी तसेच कंबरभर पाण्यात, हो गुडघ्याचे पाणी आता कंबरेपर्यंत पोचले होते, सुरक्षित ठिकाणी पोहोचण्याची प्रत्येकाची धडपड चालु होती. एव्हाना मी.. आम्ही साकीनाका ओलांडून सफेद पुल मार्गे बैल बाजारच्या दिशेने पाण्याच्या प्रवाहाला आडवे जात पुढे सरकत आलो होतो. पाऊस अजुन वाढला. त्याच वेळी सफेद पुल आणि बैल बाजाराच्या मध्येच कुठेतरी त्या झोपडपट्टीत राहाणार्या आब्बासमियांनी घराचे दार उघडून आम्हाला आत घेतले होते. त्यांच्याच घराच्या खिडकीत उभे राहून मी पुन्हा एकदा बाहेर चाललेले पावसाचे तांडव बघत होतो.
या झोपडपट्टीतली घरे येता जाताना बर्याचवेळा पाहीली असतील तुम्ही.छोटी छोटी खाली एक खोली, तिथेच शेजारी वर जाणारी एक लोखंडी शिडी उभी करून वर एक दहा बाय दहा किंवा बाराची खोली. या झोपडपट्टीतली बरीचशी घरे अशीच आहेत.
चाचांच्या घराची खालची खोली तर पाण्यातच गेली होती. त्यांच्या घरातल्या सात जणांसकट ते वरच्या खोलीत जिव मुठीत धरून बसलेले. पण तशा अवस्थेतही त्यांच्यामधला माणुस जिवंत होता. बाहेरच्या संकटात अडकलेल्यांना जमेल तेवढी मदत करण्याची त्या कुटूंबाची वृत्ती साक्षात काळालाही मान खाली घालायला लावेल एवढी थोर होती. एव्हाना त्या छोट्याशा खोलीत पंचवीसच्या वर माणसे जमा झाली होती. पण चाचाच्या किंवा त्याच्या कुटूंबियांच्या डोळ्यात थोडीसुद्धा त्रासाची, कुरकुरीची भावना दिसत नव्हती. अशावेळी आपला खुजेपणा प्रकर्षाने जाणवायला लागतो.
“उसे मत कोंसो बेटेजान! वो तो अपना काम ठिक ही करता है! ये तो हम इन्सानही है जो अपने फर्जसें चुकते रहते है और जब जानपें आ बनती है तो उस उपरवालेको कोंसना चालू कर देते है!:
किती खरं बोलत होते चाचा! वेळीच जर गटारे साफ़ केली गेली असती, मिठी नदीतला गाळ जर साफ़ केला गेला असता तर झालेली हानी आहे त्यापेक्षा खुप कमी असली असती.
मी नकळत मान डोलावली. चाचा पुढे बोलतच होते…
“बेटा, वो उपरवाला बहुत बडा कारसाज है! ये बंबई हमेशाहीसे हिंदु-मुस्लीम दंगोके लिये बदनाम रही है! वो देखो और बताओ मुझे उसमें कौन हिंदु है और कौन मुसलमाँ? कौन सिख है और कौन इसाई? आज वहा सिर्फ और सिर्फ इन्सान नजर आ रहे है! देखो…देखो… हर तरफ सिर्फ और सिर्फ इन्सान!”
मी बाहेर बघीतले. लोकांनी रस्त्याच्या मधोमध एक रांग बनवली होती. पाणी कमीजास्त होत होते. काही ठिकाणी गुडघ्यापर्यंत तर काही ठिकाणी छातीपर्यंतही आले होते. पण कुणालाही त्याची फिकर नव्हती. एकमेकांचे हात हातात धरून साथी हाथ बढाना करत हळु हळु रांग पुढे सरकत होती. एव्हाना मदतीचे हातही पुढे येवु लागले होते. रांगेतून पाण्याच्या बाटल्यांचे कार्टुन्स पुढे पास केले जात होते. पावसाच्या त्या तांडवाने माणसातला माणूस जागा केला होता.
“देखा बेटा, उपरवाला बहुत बडा कारसाज है! वो गलत हो ही नही सकता….!”
चाचाच्या डोळ्यातून अश्रुंच्या धारा वाहायला सुरूवात झाली होती. मी पुढे होवून चाचाला कडकडून मिठी मारली. त्याला म्हणालो.
“चचा, मै अपना बॅग यहा छोडके जाता हूं, पानी कम होने के बाद लेके जाउंगा !”
“अरे ऐसे तुफ़ानमें बाहर कहा जाओगे बच्चे, वहा तो मौत नाच रही है!”
खोलीतले सगळे माझ्याकडे “हा वेडा आहे की काय?” अशा नजरेने बघायला लागले होते. पण मला आता त्या मुसळधार पावसाची भिती वाटत नव्हती. मी माझ्या आयुष्यातला सर्वात श्रेष्ठ आणि पवित्र पाऊस पाहीला होता. आब्बासचाचाच्या डोळ्यात !
“चचा, आज मेरा भी दिल कर रहा है! सोचता हुं एकबार महसुस कर ही लूं…”इन्सान बनना क्या होता है?” कल परसो आऊंगा जरुर आपको मिलनेके लिये और बॅग लेने को! तब तक शुक्रिया और खुदा हाफीझ ! शुक्रीया जान बचानेका नही कर रहा हूं क्योंकी जानता हूं आप कहोगे ये तो मेरा फर्ज था! शुक्रीया कह रहा हुं एक नया विश्वास दिलाने के लिये, इन्सानीयत का ये अनोखा पहलू सिखाने के लिये! जुलाई की ये छब्बीस तारिख तमाम उम्र याद रहेगी मुझे! इस दिनने मुझे एक और परिवार दिया है! खुदा हाफिझ !! ”
आणि पुढच्याच क्षणी मी बाहेरच्या जिवन्-मृत्युच्या संग्रामाचा एक घटक बनून गेलो.
(छायाचित्रे आंतरजालावरून साभार)
*********************************************************************************************************************
विशाल कुलकर्णी
०९९६७६६४९१९
सुहास
जून 19, 2011 at 12:25 सकाळी
खुप वाईट आठवणी आहेत त्या दिवसाच्या, पण माणुसकीच्या दृष्टीने अतिशय चांगला दिवस होता. असे अनेक अनुभव अनुभवायला मिळाले होते.
सुंदर पोस्ट, प्रसंगाच गांभीर्य प्रत्येक शब्दागणिक व्यक्त होतंय !!
विशाल कुलकर्णी
जून 20, 2011 at 1:16 सकाळी
खरेच रे सुहास, खुप चांगल्या-वाईट आठवणी दिल्या त्या दिवसाने !
आनंद पत्रे
जून 19, 2011 at 3:10 सकाळी
अत्यंत सुंदर वर्णन.. चाचूंना खरंच मानलं!!
विशाल कुलकर्णी
जून 20, 2011 at 1:16 सकाळी
अशी माणसं आहेत म्हणून माणुसकी टिकुन आहे रे 🙂
राजे
जून 19, 2011 at 8:58 सकाळी
तो दिवसच भयानक होता 😦
पोस्ट आवडली.
विशाल कुलकर्णी
जून 20, 2011 at 1:16 सकाळी
धन्स मालक !
Mandar
जून 19, 2011 at 10:18 pm
Sahi!!!
विशाल कुलकर्णी
जून 20, 2011 at 1:17 सकाळी
धन्स मंदार !
वैभव टेकाम
जून 20, 2011 at 12:17 pm
मस्तच!!
विशाल कुलकर्णी
जुलै 1, 2011 at 5:59 pm
धन्यवाद राजे 🙂
MrsPallavi Deshpande
जून 22, 2011 at 3:13 pm
vishal, ,,,,,,,,,, aprateem lihile ahes
विशाल कुलकर्णी
जुलै 1, 2011 at 5:59 pm
धन्स माते 🙂
SHIVAJI MASKAR
जून 11, 2012 at 2:49 pm
KHUP CHAN VARNAN
विशाल कुलकर्णी
जून 12, 2012 at 1:20 pm
धन्यवाद 🙂
kalyani
मार्च 18, 2014 at 4:02 pm
Khup chan,, Apratim.. Bahot Khub,, Lajavab.. Owsum,, Very Nice..